संजय गांधी निराधार अनुदान योजना – पात्रता काय?, लाभार्थी कोण? अनुदान किती?, अर्ज कसा करावा? संपूर्ण माहिती
(संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाच्या
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची महत्वाची योजना)
संजय गांधी निराधार अनुदान योजना म्हणजे काय?
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली संजय गांधी निराधार अनुदान योजना ही समाजातील गरजू, निराधार, अपंग, विधवा, वृद्ध व आजारी व्यक्तींना मासिक आर्थिक मदत देण्यासाठी राबवली जाते.
या योजनेचा उद्देश निराधार कुटुंबांना किमान आर्थिक आधार देणे हा आहे.
🟥पात्र कोण? 👇
संजय गांधी निराधार अनुदान या योजनेतंर्गत
65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला,
अनाथ मुले,
अपंगातील सर्व प्रवर्ग ( किमान40% अपंगत्व ),
क्षयरोग,पक्षघात, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग ,प्रमस्तीष्कघात, यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला,
निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह ),
घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या महिला,
अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी,
देवदासी,
35 वर्षावरील अविवाहीत स्त्री,
सिकलसेलग्रस्त महिला इ.
या सर्वांना लाभ मिळतो.
🟥उत्पन्नाची अट:
दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.दिव्यांगसाठी रुपये 40,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे.
(सध्या साधारणतः ₹21,000 / ₹40,000 – स्थानिक नियमांनुसार बदल होऊ शकतो)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा