पोस्ट्स

जमीन खरेदी-विक्री करताना घ्यावयाची काळजी

इमेज
जमिनीची खरेदी-विक्री करताना घ्यावयाची महत्त्वाची काळजी जमीन खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. आयुष्याची कमाई लावून प्रसंगी कर्ज काढून आपण जमीन खरेदी करतो. त्यामुळे जमीन खरेदी करत असताना खालील मुद्दे तपासने क्रमप्राप्त आहे.  1️⃣ 7/12 उताऱ्याची तपासणी मालकाचे नाव बरोबर आहे का ते पहावे क्षेत्रफळ, प्रकार (शेती / NA) तपासावे इतर हक्क (बोजा, कर्ज, कोर्ट केस) आहेत का पाहावे नवीन 7/12 (Updated) असणे आवश्यक 2️⃣ फेरफार नोंदी (Mutation Entries) सर्व फेरफार नोंदी पूर्ण झालेल्या असाव्यात अपूर्ण / प्रलंबित फेरफार असल्यास व्यवहार टाळावा वारसा फेरफार नोंद झाली आहे का तपासावे 3️⃣ जमिनीचा प्रकार तपासणे भोगवटादार वर्ग–1: मुक्तपणे खरेदी-विक्री करता येते भोगवटादार वर्ग–2: तहसीलदारांची /सक्षम अधिकारी यांची परवानगी आवश्यक सरकारी / इनाम जमीन: विशेष नियम लागू 4️⃣ शेती जमीन की NA जमीन शेती जमीन बिगरशेती (NA) आहे का ते तपासावे NA परवानगी नसल्यास बांधकाम बेकायदेशीर ठरू शकते ग्रामपंचायत / नगरपरिषद हद्द तपासावी 5️⃣ अतिक्रमण व सीमांकन जमिनीवर अतिक्रमण आहे का तपासावे गरज असल्यास अधिकृत मोजणी करून...

फेरफार नोंद वर हरकत कशी घ्यावी?सविस्तर माहिती सोप्या शब्दात

इमेज
  (फेरफार नोंद चुकीची असल्यास तलाठी कार्यालयात हरकत अर्ज करून नोंद स्थगित करता येते.) जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर किंवा इतर महसूल नोंदींमध्ये चुकीची फेरफार नोंद (Mutation Entry) झाल्यास संबंधित व्यक्तीस त्या नोंदीवर हरकत घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. अनेक वेळा चुकीची नावनोंद, संमतीशिवाय फेरफार, किंवा बनावट कागदपत्रांवर नोंद केली जाते. अशा वेळी वेळेत हरकत न घेतल्यास पुढे मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. या लेखात आपण फेरफार नोंद वर हरकत कशी घ्यावी, कोण घेऊ शकतो, कोणती कागदपत्रे लागतात आणि पुढील प्रक्रिया काय असते, हे सविस्तर पाहणार आहोत. फेरफार नोंद म्हणजे काय? जमिनीच्या मालकी, हक्क, भोगवटा किंवा क्षेत्रफळात झालेल्या बदलाची महसूल दप्तरी नोंद म्हणजे फेरफार नोंद होय. ही नोंद प्रामुख्याने ७/१२ उताऱ्यावर दिसून येते. फेरफार नोंद वर हरकत कधी घ्यावी? खालील परिस्थितीत हरकत घेणे आवश्यक आहे: तुमची संमती न घेता फेरफार नोंद झाली असल्यास चुकीच्या व्यक्तीचे नाव नोंदवले असल्यास सर्व वारसांची नावे नोंदवलेली नसल्यास बनावट किंवा अपूर्ण कागदपत्रांवर नोंद झाल्यास मृत व्यक्तीच्या जमिनीवर चुकीची नोंद झाली असल्या...

7/12 वर वारस नोंद कशी करावी? | वारस नोंद प्रक्रिया-सविस्तर माहिती

इमेज
   ( शेतीची वारसनोंद कशी करावी याची संपूर्ण माहिती – कागदपत्रे, प्रक्रिया व नियम)                   जमीनधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या जमिनीवर कायदेशीर वारसांची नोंद करणे आवश्यक असते. या प्रक्रियेला वारस नोंद असे म्हणतात. वारस नोंद झाल्याशिवाय 7/12 उताऱ्यावर वारसांची नावे चढत नाहीत आणि पुढील व्यवहार करता येत नाहीत. या लेखात आपण वारस नोंद कशी करावी, कोणते कागदपत्र लागतात, अर्ज कुठे करायचा आणि किती वेळ लागतो याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. 🔹 वारस नोंद म्हणजे काय? जमीन धारकाच्या  मृत्यूनंतर त्याचे कायदेशीर वारस (पत्नी, मुले,नात ,नातू इ.) यांच्या नावाने जमिनीची नोंद 7/12, 8अ मध्ये करणे म्हणजे वारस नोंद होय. 🔹 वारस नोंद कधी करावी? जमीन मालकाचा मृत्यू झाल्यावर, 7/12 उताऱ्यावर खूप काळापासून  मृत व्यक्तीचे नाव असताना 🔹 वारस नोंद करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अर्ज , स्थानिक चौकशी अहवाल, जबाब, मृत्यू दाखला / मृत्यू  प्रमाणपत्र (Death Certificate), वारसाबाबतचे प्रतिज्ञापत्र,   7/12 उतारा व 8अ उतारा, सर्व वारस...

🟢 ई-पीक पाहणी कशी करावी? | शेतकऱ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शन

इमेज
                                                                      ई-पीक पाहणी अ‍ॅपद्वारे शेतकरी स्वतः पिकाची डिजिटल नोंद करताना ई -पीक पाहणी म्हणजे काय? राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांची नोंद डिजिटल पद्धतीने घेण्यासाठी सुरू केलेली प्रक्रिया म्हणजे ई-पीक पाहणी. यामध्ये शेतकरी मोबाईल अ‍ॅपद्वारे स्वतःच्या शेतातील पिकाची माहिती अपलोड करतो. 📱 ई-पीक पाहणी करण्यासाठी आवश्यक गोष्टी स्मार्टफोन इंटरनेट कनेक्शन ई-पीक पाहणी (DCS) App 7/12 उतारा 🔽 ई-पीक पाहणी कशी करावी? (स्टेप बाय स्टेप) 1️⃣ Play Store ला जाऊन अ‍ॅप डाउनलोड करा- ई पीक पाहणी (DCS)  किंवा खालील लिंक वर क्लिक करून  👉 https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova अ‍ॅप डाउनलोड करा. 2️⃣  विभाग -जिल्हा -तालुका निवडा  लॉगिन / नोंदणी करा मोबाईल नंबर टाका OTP द्वारे लॉगिन करा 3️⃣ खातेदार निवडा स्वतः खातेदार असल्यास → स्व...

फार्मर ID (Agristack Farmer ID) कसा काढावा – सोप्या शब्दांत माहिती

इमेज
  (ही प्रतिमा Agristack Farmer ID योजनेचे प्रतीक आहे. महाराष्ट्रातील शेतकरी Farmer ID कार्ड दाखवत असून या ID द्वारे शासकीय कृषी योजना, अनुदान, पीक विमा व PM-Kisan योजनेचा लाभ घेता येतो.) 🧑‍🌾 Farmer ID (Agristack) कसा काढावा? संपूर्ण माहिती भारत सरकारच्या Agristack योजनेअंतर्गत Farmer ID (फार्मर आयडी) तयार करण्यात येत आहे. हा शेतकऱ्यांचा डिजिटल ओळख क्रमांक असून भविष्यात सर्व शासकीय कृषी योजना याच ID शी जोडल्या जाणार आहेत. ✅ Farmer ID म्हणजे काय? Farmer ID हा प्रत्येक शेतकऱ्याला दिला जाणारा युनिक (Unique) ओळख क्रमांक आहे. या ID मध्ये: शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती जमीन नोंदी (7/12, 8A) आधार व मोबाईल लिंक अशी माहिती सुरक्षित ठेवली जाते. 📝 Farmer ID कसा काढावा? (Step by Step) 🔹 CSC / आपले सरकार सेवा केंद्रातून हा सर्वात सोपा आणि सध्या वापरात असलेला मार्ग आहे. प्रक्रिया: जवळच्या CSC / आपले सरकार सेवा केंद्रात भेट द्या आवश्यक कागदपत्रे द्या ऑपरेटर Agristack पोर्टलवर नोंदणी करतो आधार OTP द्वारे पडताळणी होते 🔴ज्यांचे आधार वरील नाव व 7/12 उतारा वरील नावात काही बदल नसतो त्यांचे ID ऑटोमॅटि...

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजना – पात्रता काय?, लाभार्थी कोण? अनुदान किती?, अर्ज कसा करावा? संपूर्ण माहिती

इमेज
  (महाराष्ट्र शासनाची श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजना) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजना म्हणजे काय? महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत गरजू जेष्ठ नागरिकांना आर्थिक आधार देण्यासाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा निवृत्तीवेतन दिले जाते. 🟥 योजनेचा उद्गदेश : गरीब, निराधार व उत्पन्नाचा आधार नसलेल्या जेष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य देणे व त्यांचे जीवनमान सुधारण्याचा हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. 🟥पात्र कोण? 👇 गट (अ) :   -65  ते 79  वयोगटातील  व दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या व्यक्तीना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट (अ) मधून रु.1300/- प्रतिमहिना निवृत्तीवेतन देण्यात येते याच लाभार्थ्याला केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे रु200./- प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन दिले जाते. यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून रु.1300/- प्रतिमहा व केंद्र शासनाकडून रु.200/...

संजय गांधी निराधार अनुदान योजना – पात्रता काय?, लाभार्थी कोण? अनुदान किती?, अर्ज कसा करावा? संपूर्ण माहिती

इमेज
( संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची महत्वाची योजना)   संजय गांधी निराधार अनुदान योजना म्हणजे काय? महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली संजय गांधी निराधार अनुदान योजना ही समाजातील गरजू, निराधार, अपंग, विधवा, वृद्ध व आजारी व्यक्तींना मासिक आर्थिक मदत देण्यासाठी राबवली जाते. या योजनेचा उद्देश निराधार कुटुंबांना किमान आर्थिक आधार देणे हा आहे. 🟥पात्र कोण? 👇 संजय गांधी निराधार अनुदान या योजनेतंर्गत  65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला,  अनाथ मुले,  अपंगातील सर्व प्रवर्ग ( किमान40% अपंगत्व ),  क्षयरोग,पक्षघात, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग ,प्रमस्तीष्कघात, यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला,  निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह ),  घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या महिला,  अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी,  देवदासी, 35 वर्षावरील अविवाहीत स्त्री,  सिकलसेलग्रस्त महिला इ.  या सर्वां...